Wednesday, March 30, 2011

जर भारत हरला असता तर..

काही वेळापूर्वीच भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना संपला. आणि कोट्यावधी भारतीयांच्या मनामध्ये असलेला विजय धोनीच्या वीरांनी खेचून आणला. सचिन नेहमीप्रमाणे त्याचा डाव खेळला. त्याचा १०० वं शतक हुकलं याची हुरहूरमात्र त्याच्या चाहत्यांना लागून राहिली. आशिष नेहराला खेळवण्याची धोनीची चाल कमालीची यशस्वी ठरली आणि नेहरासुद्धा अपेक्षांना जागला. पाकिस्तानच्या संघाने गचाळ क्षेत्ररक्षण कसं करावं याचं सुरेख प्रदर्शन केलं.

या सामन्यागोदर मिडीयावाल्यांनी किंवा दोन्ही संघांच्या चाहत्यांनी या सामन्याला अगदी युद्धाचं स्वरूप दिलं होतं. आज भारत जिंकला म्हणून ठीक आहे पण जर आपण हारलो असतो तर आत्ता जल्लोष करणाऱ्या याच चाहत्यांनी काय केलं असतं? हे युद्ध भारतीय संघ हरला म्हणून त्यांना काय शिक्षा दिली असती? आत्ता मैदानामध्ये झालेला हा जल्लोष कशामध्ये बदलला असता? पाकिस्तानी खेळाडू सुखरूपपणे हॉटेलपर्यंत गेले असते का?? त्यांना मुंबईमध्ये लोकांनी कशी वागणूक दिली असती. हा जो असंतोष असता तो अजून किती दिवस असाचं राहिला असता?? कदाचित पुढच्या विश्वचषकापर्यंत?? पुढच्या वेळेस भारत पाकिस्तानला हारवेल तोपर्यंत?? तुम्ही म्हणालं मला वेड लागलं आहे.पण स्वतःच्या मनाशी विचार करा आणि या प्रश्नांची उत्तरे काय असली असती याचा शोध घ्या..

अर्थात भारतीय संघ अंतिम फेरीमध्ये गेला याचा मलादेखील आनंदच आहे. आणि त्यांना अंतिम फेरीसाठी माझ्या शुभेच्छा.

Sunday, February 27, 2011

थोडासा बदल

परवाकडे मी विचार केला की बरेच दिवस झाले आपण ‌ब्लॉग लिहिला नाहीये. म्हणून मग मी नेहमीप्रमाणे माझा जे सॉफ्टवेअर मी ब्लॉग लिहायला वापरतो ते ओपन केलं आणि लिहायला सुरुवात केली. काही वाक्ये लिहुन होत नाहीत तर मला एक मेसेज दिसला की तुम्हाला आता १० मिनिटे थांबावे लागेल कारण हे सॉफ्टवेअर आता मोफत नाहीये. माझा हिरमोड झाला आणि मी लगेच लिहिणे थांबवलं. माझा एक मित्र आहे चैतन्य शिवदे नावाचा. मी लगेच त्याला पिंग केलं आणि विचारलं की बाबा रे आता याला अजून काही पर्याय आहे का? त्याने मला लगेच गुगल IME बद्दल सांगितलं. आणि मला म्हणाला हे जे गुगल चा सॉफ्टवेअर आहे ते आता डाऊनलोड देखील करता येते. आणि हे तुला कदाचित तुझ्या आधीच्या सॉफ्टवेअरपेक्षा जास्त आवडेल.
मीदेखील मग लगेच त्याने दिलेल्या लिंकवर जाऊन ते सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं. गुगलवर त्याच्या वापराबद्दल थोडी माहिती वाचली. आणि सहज म्हणून लिहायला सुरुवात केली. तर खरोखर चैत्याच्या म्हणण्याप्रमाणे गूगलचे हे सॉफ्टवेअर अतिशय सोपं होतं. मी लगेच मग विचार केला का नाही मग ह्या विषयावर आपण ब्लॉग लिहुयात. आणि मी लिहायला सुरुवात केली. खरोखर हे सॉफ्टवेअर मला अतिशय सोपं आणि सुटसुटीत वाटलं.
आणि मनापासून मी आनंदी झालो. धन्यवाद गुगल. आणि अगदी चैत्या तुझे तर अगदी मनापासून आभार.

Saturday, January 22, 2011

नमस्कार..आज पुन्हा एकदा मोठ्या विश्रांतीनंतर काहीतरी लिहीत आहे.
परवाकडे एक बातमी वाचली. अमितभने त्याच्या ब्लॉगवर १००० वा ब्लॉग लिहीला.आणि पुढे मग अमिताभ ब्लॉग लिहीताना किती नियमीतपणे ब्लॉग लिहीतो. इतर लोक किंवा सेलिब्रिटीज कसे फक्त सुरुवात करतात आणि मग जसे दिवस जातील तसे कसे ते अनियमीत होत जातात याबद्दल काही चर्चा. ही बातमी वाचून माझ्या मनात आलं मीदेखील गेले काही दिवस ब्लॉग लिहीत आहे. आणि नकळतपणॆ मग मी विचार केला की आपण असे कितपत नियमीत आहोत? आणि उत्तर आलं फारसा नाही.
आणि मग मी विचार केला आपण ब्लॉग नियमीतणे न लिहीण्यामागे काय कारण असेल किंवा असू शकेल.तर कारणं बरीच सुचली.त्यापैकी काही अशी
१. मी फार बिझी असतो. अभ्यासातून वेळ मिळत नाही.
२. ब्लॉग लिहीण्यासाठी मनात काहीतरी आलं पाहिजे.
३. एखादा विषय सुचलाच तर त्यावर पुरेसं लिहू शकू का?
४. मला माझा ब्लॉग अपडेट करण्याशिवाय अजुनही पुष्कळ कामे आहेत.
५. मी करत असलेला कंटाळा.
ही कारणं पाहून माझं मलाच वाटलं आपण उगाच ही कारणं शोधून काढतो आणि कंटाळा करत राहतो. नकळत मग बच्चनजींबरोबर तुलना केली गेली. तो ६० वर्षाहून जास्त वय असलेला माणूस जर नियमीतपणॆ लिहीत असेल तर आपण का नाही.काम तर त्यालासुद्धा आहे. मग आपण हे का करू शकत नाही. मला माझ्या काही मित्रांनी शिव्यादेखील दिल्या, "गुंड्या मेलास की काय? काहीच लिहीलं नाहियेस इतक्यात." आणि मग विचार केला आपण खरचं आपण नियमीतणे लिहुयात.इथून पुढे जमेल तितकं नियमीत लिहीण्याचा प्रयत्न करेल.तोपर्यंत राम राम.