Thursday, February 4, 2010

उत्तरायण

२००५ साली मराठीमध्ये एक चित्रपट आला होता. उत्तरायण नावाचा. त्या सालचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता. साठीमध्ये असलेला रघु आणि दुर्गी हे बऱ्याच वर्षांनी भेटल्यानंतर त्यांना एकमेकांबद्दल वाटू लागलेलं प्रेम आणि या वयात हे असं काही करायचं म्हणून दोघांच्याही मनात झालेला कलह याचं सुरेख चित्रण या चित्रपटामध्ये केलेलं आहे. अलिकडेच मी हा चित्रपट पाहिला. त्यातलं एक गाणं मनाला भिडलं. गाण्याचे बोल खाली देत आहे. तुम्हालाही आवडेल अशी आशा.

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वाऱ्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना
सये रमुनी या जगात रिक्त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे?
धुंद होते शब्द सारे!

मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा!

गीत- कौस्तुभ सावरकर
चित्रपट- उत्तरायण
(साभार-http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1924.htm)

1 comment:

  1. Lai Bhari re Gundya,
    ashach kahi oli athavalya tya lihito...

    Nirjiv Usase Varyanche,
    Aakash Fikatalya Taryanche,
    Kujbhujahi Navhati Velinchi,
    Hitgujahi Navhate Parnanche,
    Aaishya Thakalelya Udhyani,

    swar.....

    ReplyDelete