Thursday, October 1, 2009

नमस्कार.माझं नाव आदित्य गुंड.मी तसा मूळचा राहणार जुन्नरचा.छ्त्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या गावात झाला त्या गावात माझा सगळं बालपण गेलं.खरं तर या बाबत मी स्वतःला फार नशिबवान समजतो.एकूणात सगळं छान झालं असा मला वाटतं.
तर मी १२ वी पर्यंत माझ्या या छोट्याशा गावात शिकलो.आणि पुढे अभियांत्रिकी करता पुण्यात आलो.पुण्यात मी व्यतीत केलेला काळ मी माझ्या आयुष्यामध्ये फार फार महत्वाचा मानतो.या कालावधीमधे मला खूप काही मिळालं.खूप मित्र,खूप मैत्रिणी,खूप माणसं आणि खूप चांगले अनुभव आणि अर्थात काही वाइट अनुभवसुद्धा.आणि या सगळ्यातुन मी शिकत गेलो.स्वतःला संपन्न करत गेलो.हे सगळं करत असताना बरचं शिकायला मिळालं.
कॉलेज मधे असताना मी खूप दंगा केला.लोकांची बोलणी खाल्ली.पण आता त्याचा फार काही वाटत नाही.कुठेतरी हे सारं काही आपल्या आयुष्यात घडलं याचा आनंद होतो.ब्लॉग लिहावा असा खुप दिवसांपासून खरं तर मनात होतं.पण मला वेळ मिळत नव्हता म्हणा किंवा मी कंटाळा करत होतो म्हणा.पण अद्वैत बोराटे नावाची एक असामी सुदैवाने मला भेटली.हा माणूस लिहायचा बरचं काही.आणि ते सगळं त्याच्या ब्लॉग वर टाकायचा.मला एकदा तो म्हणाला अरे गुंड्या तू पण लिहीत चल. तुझा ब्लॉग सुरू कर.आणि मग एके दिवशी अखेरीस मुहूर्त सापडला बुवा.गॆलो एक दिवस सायबर कॅफेमधे आणि केलं लिहायला चालु.म्हटलं बघु तरी किती दिवस आपण हे चालु ठेवतोय ते.पहिला ब्लॉग तर आला बुवा.मला लय्य्य भारी वाटलं.पण हे इथेच संपल हो. पुढे मी काही लिहीलचं नाही.बरेच दिवस असेच गेले.मग मला अद्वैतने शिव्या दिल्या. कसाबसा मी दुसरा ब्लॉग लिहिला.आणि हे प्रकरण इथेच संपणार असा अंदाज माझा मीच केला.नंतर मी सुद्धा कामात अडकत गेलो.आणि ब्लॉग प्रकरण थांबुन गेलं.
नंतर मग या नविन देशात आलो.अमेरिका असा नाव त्याचं.आणि मग पुन्हा असा वाटलं की आपण परत लिहावं.आणि तशी सुरुवात पण केली मी.मग वाटलं का नाही मराठी मधे लिहावं.आणि मग त्यासाठी बराच खटाटोप करुन शेवटी हा ब्लॉग लिहायला घेतला.पण दुर्दैव असा की तोपर्यंत माझं वेळापत्रक बरचं बिझी झालं होता.खरं तर हा ब्लॉग पण मी गेले काही दिवस लिहित आहे.जसा वेळ मिळेल तसा.हा माझा मराठी फॉंट वापरुन लिहीलेला पहिला ब्लॉग आहे.त्यामुळे फारसं काय लिहावं हे कळत नाहीये खरं तर.पण हळुहळू मी जसा मला वेळ मिळेल तसा लिहीत जाइल. सध्या इथे थांबतो.आणि हा मराठी मधुन लिहायचा उत्साह पण किती दिवस टिकतो ते बघुयात आपण.सध्यासाठी एवढं पुरे.

3 comments:

  1. Bhari..lihilay tar chan ch ani te pan marathit..tyachyamule jast effective watatay..ani mala na 11 th madhle clg che diwas athwle..tu kay kay karname karayachas te sagle athwle ho mala..hehe..

    ReplyDelete
  2. he he..kharay...pan tyat tar khari maja yayachi mala...abhyas kay ho..roj asaycha..he ase udyog roj nahi karta yet...mhanun tar na..ha ha ha

    ReplyDelete
  3. iLikes the concept of a Marathi blog..kudos!!!!

    ReplyDelete